Contact Us

Bungalow No 7, Suriya Nagri Society,
House No: 933, Kankradi Road,
Dahanu Road – 401602

contact@aroehan.org

+91 25202 99245

315302637_5478174492305194_6079088950095848176_n

मोखाड्यातील 11 कातकरी मजुरांची आरोहनने केली वेठीतून मुक्तता

मोखाडा तालुक्यातील पोशेरा कातकरी वाडीतील 11 कातकरी मजुरांना पंढरपूर येथे ऊस तोडणीचे काम देतो असे सांगून उस्मानाबाद येथील सारंग नामक व्यक्तिने 50 हजार रुपयाचे आमिष दाखवून 4 कुटुंबातील 11 मजूर व 6 लहान बालकांना पिक अप गाडीत घालून कर्नाटक मधील तिसऱ्याच मालकाकडे विकले असल्याची माहिती आरोहनची कार्यकर्ती मंजुळाने मला काल दिली. मी तिच्याकडून मजुरांपैकी कोणाचा फोन नंबर मिळतो का याची माहिती घेतली. योगायोगाने एका मजुराचा नंबर मिळाला. त्याच्याकडून मी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तेव्हा त्याने सांगितले की, आम्हाला पंढरपूर येथे ऊसतोडणीचे काम देतो असे खोटे सांगून आम्हाला कर्नाटकच्या बेळगाव मधील एका अनोळखी मालकाच्या ताब्यात देण्यात आले. आमची फसवणूक झाली आहे. तो मालक आम्हाला पहाटे 3 वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जबरदस्तीने कामाला लावतो. जादा काम करण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देतो. तेथून आम्हाला तो सोडतही नाही. आम्हाला शिवीगाळ करतो, उस्मानाबादच्या मालकास फोन केल्यास तो तुम्हाला तेथेच काम करावे लागेल असे सांगून मालकाला भडकवतो व आम्हाला धमकवतो. आमचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. आम्हाला कोणताही आधार नसल्याने आम्ही सर्व दहशतीमध्ये असून खूप घाबरलो आहोत. तुमच्या फोनमुळे आम्हाला धीर आला आहे. त्याची ही हकीकत ऐकून मी त्याला आरोहन संस्थेच्या मार्फत लवकरच तुमची सुटका करण्याचा विश्वास दिला. त्याला खूप हायसे वाटले.

या प्रकरणाबाबत मी संस्थेचे सी.इ.ओ. अमित नारकर यांचे समवेत चर्चा केली, चर्चेतून ठरल्याप्रमाने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जव्हार यांना सविस्तर पत्र लिहून भालचंद्र साळवे सह भेटायला गेलो. परंतु त्या कार्यालयात नसल्याने भेट होऊ शकली नाही, मग फोनवरून सांभाषण केले. प्रकरणाचे गंभीर्य ओळखून प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोखाडा तहसीलदारांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले, त्याप्रमाणे कालपासून त्या मजुरांना सोडविण्याचे प्रयत्न सुरु झाले. आज सकाळी महाराष्ट्र पोलीस मजुरांपर्यंत पोहचले. त्यांनी मजुरांची चौकशी करून त्यांना मूळ गावी येण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. आज रात्री किंवा उद्या सकाळी हे मजूर आपल्या गावी परतातील. या गंभीर प्रकरणाची दखल जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीम. आयुषी सिंह यांनी ज्या तात्परतेने व संवेदनशीलतेने घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानावे तेवढे थोडे आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे 11 कातकरी मजुरांना वेठीतून मुक्त करण्यास यशस्वी झाल्याचे समाधान वाटते.

मात्र मोखाडा – जव्हार तालुक्यातील असाहाय व नडलेल्या कातकरी समाजाचे शोषण केव्हा थांबणार? हा प्रश्न मन सुन्न करतो.

प्रदीप खैरकर,आरोहन.

AROEHAN

Barbarity behind a “marriage”

Click here to read the original story in Marathi

Marriage is said to be one of the happiest moments in a person’s life. Some call it a sacred bond. But this true story of a marriage is shocking showing the blackening of humanity. It mirrors the perverse mentality of exploiting and oppressing girls and women (especially tribals) in society by taking advantage of their poverty and helplessness.

This is the story of a 17-year-old minor girl from Katkari Wadi of Mokhada, a tribal-dominated taluka of Palghar district. 5 to 6 Kms from the Taluka location lies a village called Poshera. To the east of this village is Katkari Wadi with a population of around 600-700. It was reported that a minor girl named Abla (the name is changed) was being forced to marry in exchange for money and the girl was being pressured for it. A social worker from AROEHAN came to know about the situation. Realizing the seriousness of the incident, the activists of the organisation reached the village immediately. They met with the minor and her family. The reality of the situation was shocking.

AROEHAN ACTIVISTS INQUIRE THE SITUATION IN KATKARI WADI

It was reported that an unknown person from Chalisgaon-Nagar Deola in Jalgaon district has a connection with a middleman in the tribal community to take the advantage of the poverty and helplessness of tribes. The minor’s aunt revealed that the suspect gave the father Rs. 15,000 in exchange for marrying the girl to him and would give Rs. 50,000 more after the marriage. The father signed the affidavit for it. (This affidavit is available but we do not have a copy with us). The minor’s mother passed when she was young and was looked after by her aunt. The father’s financial condition is poor and is an alcoholic. He does not pay attention to the girl and agreed with the marriage proposal in exchange for money. None of the rites of pre-wedding took place, the girl did not even see the person once. To impress the daughter and the father, the person used to send photos of expensive clothes and sarees and pressured her to get married to him as soon as possible. The girl talked with the boy a couple of times on the phone. As the situation looked suspicious, the relatives told the mediator to make proper arrangements to see the boy. The broker instead told the father to go to the boy’s house and do the “Kumkum ceremony”. The father said they cannot have a such ceremony without the daughter. Upon insistence, both father and girl went to boy’s house but there were no people responsible for the ceremony present. The aunt became suspicious about the situation and asked the girl’s father to take a hard look at the situation. He thought about it and decided not to marry the girl.

After the rejection, the broker pressured the family to return the Rs. 15,000. The father and the daughter were shocked. They could not return the money as it was already spent. They reached out to AROEHAN and we gave them support. We asked them not to give him any money. The broker came to the village and AROEHAN’s activists had a conversation with him. The broker was warned not to pester the family anymore or there will be legal action against him. He publicly agreed to not ask for money again. Though the issue was resolved it brought attention to a bigger issue here. There’s a suspicion there is criminal activity possibly backed by a gang or individual to sell/traffick tribal girls in the name of marriage going on. Because we came to know from many people about the occurrence of such incidents in the area. 

According to them, every year in Jawhar and Mokhada many tribal girls go missing. A muffled discussion could be heard about it now and then. These incidents do not come forward due to the dire economic condition of the tribes, lack of awareness among people, and also issues like alcoholism play a role in it. It is said that parents of girls fall prey to the lure of a small amount of money and engage their daughters. Even if there is any sort of opposition, the parents sometimes take the culprit’s side as they have taken the money. They also get afraid of the brokers and the other party thinking they might harm the family or even murder them, and they don’t come forward with the issue. What’s more numbing is that the brokers who arrange such marriages to take advantage of poor people and minor girls are often from their own community and locality. Due to sheer unawareness and fragile conditions, sometimes parents don’t even realise their daughters are been taken advantage of and there is no question of anyone complaining. This terrible reality is not publicly read or recorded anywhere. Even after 75 years of independence tribals are making such bargains for their daughters and their wings are cut before they even get a chance to fly. What kind of freedom do we live in? It’s high time we look at such situations carefully and act now.

-Pradeep Khairkar (translated to English by Naitri Patel)
AROEHAN

Click here to read the original story in Marathi

                                                                                                                

AROEHAN

एका लग्नामागचे क्रौर्य …  !

खरं तर लग्न हा मनुष्याच्या  आयुष्यातील एक आनंददायी ठेवा म्हटला जातो. काही जण त्याला पवित्र बंधन असेही म्हणतात. पण मी आज ज्या लग्नाची सत्यकथा  सांगणार आहे ती संवेदनशील माणसाची मती गुंग करणारी  आहे, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आणि समाजातील मुली-महिलांच्या (विशेषत: आदिवासी) गरिबी व असाहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे  शोषण आणि दमन करण्याच्या विकृत मानसिकतेचा आरसा दाखवणारी आहे.

ही गोष्ट आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासीबहुल तालुक्याच्या कातकरी वाडीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची. तालुक्याच्या ठिकाणापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावर पोशेरा हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पूर्वेला साधारण ६००-७०० लोकसंख्या असणारी कातकरी वाडी आहे. या ठिकाणी  अबला नावाच्या (नाव काल्पनिक आहे) एका अल्पवयीन मुलीचे पैशाच्या मोबदल्यात जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला असून त्यासाठी मुलीवर दबाव टाकला जात असल्याची  माहिती ‘आरोहन’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीला मिळाली. तिने संस्थेच्या वरिष्ठांना येऊन ही माहिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून  संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब  ते गाव गाठले. आणि पीडित मुलीच्या वडिलांची, काकीची व मुलीची भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना जे वास्तव समोर आले ते अंगावर काटा आणणारे होते.

कातकरी येथील परिस्थितीची तपासणी करताना आरोहण

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव-नगर देवळा येथील एका अनोळखी व्यक्तीने आदिवासी समाजातीलच एका मध्यस्थ दलालाला  हाताशी धरून मुलीच्या व तिच्या वडिलांच्या गरिबीचा, अज्ञानाचा व असाहाय्यतेचा फायदा घेऊन मुलीस १५ हजार रुपये  देऊन व वडिलांस ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असल्याची माहिती मुलीच्या  काकीने दिली. (हे प्रतिज्ञापत्र उपलब्ध होऊ शकले नाही, त्याची प्रत मुलीच्या नातेवाईकांकडे देण्यात आली नाही.) मुलीच्या आईचे  मुलगी लहान असतानाच निधन झाले असल्याने लहानपणापासून काकीनेच तिचा सांभाळ केला. वडिलांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने व व्यसन असल्याने मुलीकडे त्याचे लक्ष नव्हते. ५० हजाराच्या आमिषाने सुरुवातीला त्यानेही या लग्नास संमती दिली होती.  परंतु लग्नासाठी आवश्यक असणारे कोणतेही रीतीरिवाज पाळले गेले नव्हते. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला नव्हता. मुलीला व वडिलांना प्रभावित करण्यासाठी, नवरा मुलगा या मुलीच्या फोनवर बस्ता बांधल्याचे फोटो (भारी कपडे व साड्या, इ.) पाठवून लवकरात लवकर लग्न करण्याबाबत दबाव वाढवत होता. एक दोन वेळा मुलाशी फोनवरून संभाषणही करण्यात आले. हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने  मुलीच्या पाहण्याचा रीतसर कार्यक्रम करावा असे नातेवाईकांनी मध्यस्थाला सांगितले. परंतु  मध्यस्थाने फक्त वडिलांना ‘मुलाच्या घरी जाऊन कुंकू लावण्याचा कार्यक्रम करू’ असे सांगितले. वडिलांनी मुलीशिवाय असा कार्यक्रम कसा करता येईल? असा प्रश्न उपस्थित केला. अखेर वडिलांच्या आग्रहाखातर, हो -ना करत मुलगी व वडील मुलाच्या घरी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमासाठी गेले. तेथेही कार्यक्रमासाठी  कोणी जबाबदार माणसे नव्हती. या सगळ्या गडबडीमुळे मुलीच्या काकीला संशय आला. तिने तिच्या वडिलांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली. अखेर विचारांती त्यांनी हे लग्न करण्यास नकार दिला.  

 हा नकार मिळाल्यानंतर मध्यस्थ दलालाने मुलीकडे १५ हजार रुपये परत करण्याचा तगादा लावला. तिच्यावर दबाव टाकू लागला. त्यामुळे मुलगी, तिचे वडील व काकी हवालदिल झाले होते. कारण पैसे तर खर्च झाले होते. आता पैसे आणायचे कुठून? या विवंचनेत ते पडले होते. अशा परिस्थितीत अडकलेल्या या कुटुंबाला ‘आरोहन’ने मानसिक धीर दिला. पैसे परत करण्याची काही गरज नाही असे सांगून ‘आरोहन’ तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. दरम्यानच्या काळात तो मध्यस्थही तेथे आला. त्याच्यावर आरोहनच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबती करून तो करीत असलेले काम किती समाजविघातक व बेकायदेशीर आहे, याची कडक समज दिली व यापुढे मुलीकडे किंवा तिच्या नातेवाईकांकडे परत पैशांची मागणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. मध्यस्थाने पुन्हा पैसे मागणार नसल्याचे सर्वांसमोर मान्य केले. येथे एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा कट उधळला गेला. तात्पुरता हा प्रश्न मिटल्याचे समाधान वाटले. परंतु वरवर दिसणारी लग्नाची ही घटना फक्त लाग्नापुरती मर्यादित नसून यामागे लग्नाच्या नावाखाली आदिवासी मुलींची विक्री / तस्करी करणारी टोळी किंवा व्यक्ती कार्यरत असावी असा संशय येण्यास पुरेसा वाव असल्याचे लक्षात आले. कारण अशाप्रकारच्या अनेक घटना या भागात घडल्या असल्याचे विविध लोकांकडून कळले.   

अधिक माहिती घेतली असता दरवर्षी जव्हार-मोखाडा या भागातील अनेक आदिवासी मुली बेपत्ता  झाल्याची दबक्या आवाजातील चर्चा ऐकावयास मिळाली. या घटना पुढे येत नाहीत कारण या भागातील आदिवासींची अतिशय दारुण आर्थिक परिस्थिती, अज्ञान व व्यसनाधीनता असल्याने मुलींचे पालक थोड्या पैशाच्या अमिषाला  बळी पडून अशा प्रकारचे व्यवहार करीत असल्याचे बोलले जाते. प्रकरण उघडकीस आले किंवा कोणी विरोध केला तर पालक  संबंधित गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहतात. याहूनही सुन्न करणारी  बाब म्हणजे, अशाप्रकारच्या असाहाय्य व गरीब मुलींना शोधून त्यांच्या लग्नाचे सौदे करणारे मध्यस्थ दलाल हे इथल्याच समाजातील व परिसरातील आहेत. अर्थात त्यांचीही गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांचाही अशा कामासाठी वापर करून घेतला जातो हे त्यांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे कोणी तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परिणामी या भयाण वास्तवाची जाहीर वाच्यता किंवा नोंद कुठेही होत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासींना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलींचे असे सौदे करावे लागत असतील आणि उमलण्याआधीच अशा कळ्या कुस्करल्या जात असतील तर आपण कोणत्या स्वातंत्र्यात राहतो ? याचा अंतर्मुख होवून विचार करण्याची व  शीघ्र कृती करण्याची वेळ आली आहे असे प्रकर्षाने वाटते.    

-प्रदीप खैरकर
आरोहन

DSC_0036

Agribusiness and Fish Farming Training

In the quest to increase livelihood and income opportunities for farmers, AROEHAN organises trainings for farmers every month. Various initiatives like orchard farming, social forestry, pieces of training, and workshops for farmers.

This month we conducted training sessions on Agribusiness and Fish Farming. The Agribusiness sessions were held in association with Krishi Vigyan Kendra, Kosbad Hill at Gomghar and Koshimshet on September 16 and 20. Over 120 farmers attended these sessions on orchards and rice plantations. Facilitators Bharat Kushare and Uttam Sahane educated farmers on fertilizer methods and management, pest control, and orchard cultivation, and gave guidance on flora management, organic fertilisers, and water a primary source of income for flower farming, and multi-cropping planning. Rice plantation is
most farmers. The trainers guided them on identifying pests and diseases affecting rice yield and how to control it. Trainers gave extensive guidance on how to increase production at a lower cost and discussed effective planting technologies. Farmers were provided with information booklets and pheromone traps for pest control at the end of the session. For people interested in fish farming, a separate three-day training was held from September 21 to 23. The training was facilitated by experts from Taraporwala
Research Centre, Dr. Shardul Gangad, Pravin Sapkale and Ravindra Bondre. The trainers gave extensive guidance on methods and opportunities in fish farming. The participants were educated about different fish breeds, the usage of fish seeds, the types of fish farming and the challenges that came with it. The trainers helped them to chalk out how to get started with fish farming. From site selection to breeding and markets and sales, the attendees were given detailed guidance. The 25 participants were honoured with information booklets, pest traps, fish seeds, and certificates on the last training day. AROEHAN plans to utilise fish farming as a sustainable source of livelihood and income for marginalised and landless farmers and other less privileged populations. Local fish breeding, containing and food processing, storage, networking, and sales will be the main focus of this initiative in the near future. Upon giving the vote of thanks to Taraporwala
Research Centre, AROEHAN’s CEO Amit Narkar urged them to extend their support to fish farming as we embark on this initiative. Dr. Shardul Gandad seconded it and said they will make all the possible
efforts to help expand this initiative in the future.

WhatsApp Image 2022-10-06 at 16.11.53

‘आरोहन’ मुळे वाचला बाळ बाळंतीणीचा जीव

बालवि वाह थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न होत असले, कायद्याने त्यावर बंदी असली तरीदेखील ग्रामीण भागांमध्ये बालविवाह सर्रास होताना आढळतात. या भागांमधील कि शोरवयीन मुलं-मुलींसमोर शिक्षणाचा अभाव, बालविवाह, बालमजुरी, लहान वयात आलेली घराची जबाबदारी, बाळंतपणे असे अनेक प्रश्न आहेत. बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करतानाच आरोहन ज्यांची लहान वयात लग्नं झालेली आहेत, अशांसो बतही काम करते. आरोहनची आरोग्य समिती गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना नियमित भेट देत असते. अशाच एका भेटीदरम्यान प्रकल्प संपर्क अधिकारी वनिता खारपाडे यांची भेट जव्हारच्या सरसून या दुर्गम भागातील मोकाशीपाड्यात राहणाऱ्या दिय या १५-वर्षीय गरोदर मुलीशी झाली.
या भेटींदरम्यान आरोहनतर्फे गरोदर व बाळंतीण महिलांचे समुपदेशन केले जाते, ज्यामध्ये त्यांना सरकारी योजना, आरोग्य व पोषण आणि बाळंतपणानंतरच्या काळजीबद्दल माहिती देण्यात येते. त्यांना १०८ आणि १०२ सारख्या आपत्कालीन संपर्क क्रमांकांबद्दल जागृत केले जाते. मात्र वनिता यांनी दियाला त्यांचा स्वतःचा वैयक्ति क मोबाईल क्रमांक देऊन ठेवला.
दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी जव्हार तालुक्यातील सारसून मोकाशीपाडा या दुर्ग म गावातील दिया नामक एका 14-15 वर्षे वयाच्या बालविवाह झालेल्या मातेने सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान एका बाळाला जन्म दिला. बाळंतपण घरीच झाले. माता अल्पवयीन असल्याने बाळ व बाळंतीन या दोघांचीही तब्येत गंभीर होती. गावातील आशा कर्मा चारी बाहेर असल्याने अंगणवाडी ताईला कळविण्यात आले. बाळ बाळंतीणीची गंभीर परिस्थिती बघून काय करावे ति लाही काही सुचेना. पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी 108, 102 नंबरच्या गाड्यांना फोन केले परंतु गाड्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. अखेर तिने आरोहन ची कार्यकर्ती वनिता खरपडे हिला फोन केला, वनिताने क्षणाचाही विलंब न करता जशी होती त्या अवस्थेत मोकाशीपाडा गाठला. प्रायव्हेट गाडीची व्यवस्था करून जामसर येथील प्राथमि क आरोग्य केंद्रात दाखल केले.

जन्मानंतर दोन तासाने बाळाच्या अंगावर काच फोड आले, त्यामुळे पेशंटला जव्हार येथे हलविण्यात आले, तेथे बाळावर उपचार सुरु केले, नवऱ्याचा दिवसभर पत्ताच नाही. सो बत फक्त आई. बाळ -बाळंतीला कपडे नव्हते वनिताने तिच्या घरी जाऊन कपडे आणून दिले. दरम्यान रक्तस्त्राव अधिक झाल्याने मातेची तब्येत गंभीर झाली. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजतां दोघांनांही नाशि कला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले. पुढील दोन-तीन दि वस हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार मिळाल्याने बाळ-बाळंतीणीच्या तब्येतीत सुधारणा झाली. तिच्या जि वावरचा धोका टळला. या सर्व घटनाक्रमात वनिताने चोख भूमि का बजावली. घटनेचे गंभीर्य ओळखूनत्या वेळेत पोहचल्या नसत्या आणि योग्य उपचार मिळाले नसते तर बाळ-बाळंतीणीचा जीव धोक्यात येवू शकला असता. या गंभीर परिस्थिचीची तात्काळ दखल घेऊन वनि ताने समयसूचकता दाखवत ज्या संवेदनशीलतेने ही केस हातळाली त्याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच! तिच्या कार्याला सलाम !

Rural Development NGO

WATCH: AROEHAN empowers villages to formulate GPDP

Local NGO AROEHAN empowers communities to formulate Gram Panchayat Development Plan in rural villages.

Jan samvaad 2

Women Healthcare Public Dialogue in Mokhada

AROEHAN NGO holds a Health Public Dialogue for tribal women of Mokhada.

Meeting-Jambhlvadi-750

जीवन मरणाच्या कांट्यावर शेड्याचा पाडा

‘आरोहन’साठी काम करताना मी जे पाहतो ते मला अगदी हलवून टाकते. ‘आरोहन’ (आरोहण नव्हे) ही एक जव्हार – मोखाडा भागात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे.

आरोहन स्थापन व्हायला एक दुर्घटना कारण झाली. पंधरा वर्षापूर्वी मोखाड्यात १६९ बालके कुपोषणाने मृत्यू पावल्याची बातमी आली तेव्हां तिथल्या समाजात जाऊन काम करायचे ठरले, आवश्यकच होते ते. आदिवासी गटांच्या समवेत काम करून परिवर्तनाची ठोस पावले उचलण्यासाठी आरोहन काम करीत आहे.

मी कुर्लोदला माधुरी, गणेश – ते दोघे आरोहनसाठी काम करतात – आणि सुलभा, माझ्या पत्नीसोबत, गेलो. जव्हारपासून मोखाड्याच्या रस्त्यावर जाताना एक उजवीकडे फाटा येतो, तिथे वळून बरेच अंतर डोंगर-दऱ्यातून गेल्यावर आपण कुर्लोद्ला येतो. नऊ पाड्यांचे कुर्लोद गाव आहे. हे पाडे म्हणजे दहा ते तीस-पस्तीस घरांची वस्ती आहे. आम्ही पेठेच्या पाड्याला उतरलो. गाडी तिथेच ठेवली. ‘पुढे पायी जायचे आहे’ माधुरी म्हणाली. आम्हाला शेड्याच्या पाड्याला जायचे होते. माधुरी आणि गणेशने आमच्यासाठी तिथल्या लोकांबरोबर भेटी ठरवल्या होत्या. (त्या भेटींबाबत मी नंतर लिहिणार आहेच).

शेड्याचा पाडा अदमासे दोन किमी दूर आहे, पण तिथे जायला ‘पिंजल’ नदी पार करावी लागते. नदीचं पात्र मोठं असलं तरी ती बारमाही नाही, आम्ही नदीच्या कांठी पोचलो तेव्हां नदीत फार पाणी नव्हतं.

परंतु नदी पार करायची तर पात्रातल्या खडकांवरून स्वत:ला सांभाळत जायची कसरत करावी लागते. नदी पार केली की एक अगदी लहानसा चढ लागतो, थोडं पुढे गेलो की आपण जांभूळवाडीला येतो. शेड्याचा पाडा त्यापुढे आहे, तिथे पोहोचायला अधिक थोडं चालायला हवं. पावसाळ्यात शेड्याचा पाडा आणि जांभूळवाडी एका बाजूला व पेठेचा पाडा दुसर्‍या बाजूला – मध्ये पिंगल नदी दुथडी वाहत असते, त्यामुळे त्यांचा संपर्क पेठेच्या पाड्याशी तुटतो. जगाशीच तुटतो म्हणाना. कारण शेड्याच्या पाड्यामागे मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या जिवाशीच खेळ असतो.

सरिता व मीनाक्षीने आमच्यासाठी भेटीसाठी सर्व तयारी केली होती. भेटी संपवून आम्ही परत निघालो. नदीवर पोहोचायच्या आधीच आम्हाला जांभूळवाडीपाशी दोघे जण भेटले. ते माधुरी व सरिताबरोबर कांही बोलले. ते चिंतेत दिसले.

“एक माणूस बराच आजारी आहे, त्याला तात्काळ इस्पितळात न्यायला हवं. ते विचारत होते की आपली गाडी मिळू शकेल कां त्याला न्यायला?”

“मग तू काय उत्तर दिलंस?”

“मी हो म्हणाले. तो सिरीयस आहे, मग त्याला मदत करायलाच हवी.”

“आपली गाडी तर पेठेच्या पाड्यात आहे. ते नदी कशी ओलांडतील? पेशंट चालू शकेल का?”

“ते त्याला झोळीत घालून आणतील. नेहमी तसेच करतात. दुसरा कांहीच मार्ग नाही.”

आम्ही निघालो. नदी पार करून चार पावले चाललो. माधुरीमागे वळून म्हणाली, “ते पहा ते त्याला घेऊन आलेच की आपल्या मागे.”

ते नदी झपाझप पार करत होते. मला नदी पार करताना दगडांवरून तोल सांभाळत जावे लागले होते, तर ते जणू हायवेवरून चालत होते. दोघांनी एक मोठी काठी खांद्यावर घेतली होती व त्यावर एक झोळी होती. त्यात त्यांचा रुग्ण होता. म्हणजे त्यांच्या खांद्यावर कमीतकमी पन्नास किलोचे ओझे होते, तरीही ते झपाझप पावले टाकीत निघाले होते. आणि ते देखील अनवाणी पायांनी.

मी खिशात हात घालुन मोबाईल काढला. त्यांचा व्हिडिओ काढला.

“कुठे जातील हे लोक?” मी माधुरीला विचारले.

“इथून वीस किलोमीटरवर इस्पितळ आहे. तिथे घेऊन जातील ते आपल्या गाडीतून. मग आपली गाडी आपल्याला न्यायला परत येईल.”

“पावसाळ्यात नदी ओलांडणं शक्य नाही, अशी वेळ आली तर ते काय करतात?”

“काहीच करता येत नाही. रुग्णाने जगावं की मरावं हे तो ‘उपरवाला’ ठरवतो.” तिने आभाळाकडे बोट दाखवले.

“इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशी तजवीज आहे. २०१४ पासून ते मंजूर झाले आहे. पण अजून कांहीच झाले नाही.”

“येईलच ते, आपण आशा सोडू नये” कोणीतरी म्हणाले.

“तोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न ही नदीच सोडवेल”

आमची गाडी त्या रुग्णाला देतां आली, या जाणि‍वेनी मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आमची गाडी उपलब्ध असणं हा तर केवळ योगायोग होता.

आम्ही पाड्याकडे निघालो. कोणी एक शब्दही बोलले नाही. हतबलतेने मन ग्रासून टाकले होते.

विवेक पटवर्धन

Patient-Ambulance750

Life And Death At Shedyacha Pada

Working with Aroehan has been an eye opener for me. Actually, it delivers shocks when I witness the activities.

Aroehan is an NGO. In 2005-06, 169 children below the age of six died in Mokhada due to malnutrition. That led to formation of AROEHAN. It is striving to bring sustainable changes to the tribal communities. I got associated with Aroehan over the last two years.

With Madhuri, Ganesh (who work for Aroehan) and Sulabha, my wife, I went to Kurlod. It is a village consisting of many ‘pada’ or hamlets. Our vehicle took us to Pethecha Pada. Madhuri said that we had to walk to Shedyacha Pada where she had arranged meetings with the villagers. (More about our discussion with the villagers in another blog).

Shedyacha Pada is about two Kms away from Pethecha Pada, but you must cross a river. Pinjal River.

Pinjal-River

Presently the river does not have much water so one can cross it easily, jumping over the rocks. Then you climb up a tiny hill to Jambhul Vadi. Shedyacha Pada is a little further away. In the monsoon, both these hamlets get cut off completely from Pethecha Pada, putting the villagers’ life at risk in many ways.

We finished our meetings with people at Shedyacha Pada. Sarita and Meenakshi from Aroehan had arranged all meetings. We were walking back to cross the river when two persons approached us at Jambhul Vadi. They had some discussion with Madhuri and Sarita. They looked worried.

Madhuri and Sarita in discussion with Patient's relatives Madhuri and Sarita in discussion with Patient’s relatives

 

“A person is very sick. He must be taken to Hospital immediately. They were asking if he can be taken in our vehicle.”

“What did you say?”

“Yes, I said. If somebody is critically ill, there is no choice.”

“How will they cross the river? Can the patient walk?”

“They will carry him in a hammock. They do it – I mean they have to do it often. Sad. There is no way out!”

We crossed the river. And walked a few steps when Madhuri looked back and said “Look, they are already on the way.”

I turned back. They were crossing the river. It had taken me good time to cross it, balancing my way on the rocks. They crossed it as if it was as smooth as a runway! They walked incredibly fast with a fifty-kilo patient cuddled in their hammock! And barefoot!!

Carrying Patient in a Hammock across Pinjal River Carrying Patient in a Hammock across Pinjal River

I reached for my mobile and shot the video.

“Where will they go?” I asked Madhuri.

“There is a hospital about twenty Kms away. Our vehicle will take him there and then it will return to pick us up.”

“What happens when the river is in spate during the monsoon?”

“HE decides if the patient must survive or die. No help is available.” She pointed finger to the sky.

“A PHC (Primary Health Centre) unit is sanctioned for us. Since 2014. But it has not come up.” A villager said.

“It will come up soon. We must not lose hope,” another said.

“Till then this river will decide the life and death issues” the villager said.

I was feeling relieved that our vehicle was available for the patient. That it was available was just a coincidence.

We walked our way to the Pada. No word uttered. Feeling helpless. And powerless.

MataBaithak-1

आरोहन आणि आदिवासींच्या जटील समस्या

आरोहनच्या कामाची माहिती करून घेणे ओघानेच आले, कारण आरोहनने विश्वस्त म्हणून त्यांच्या समितीत मला सामावून घेतले. जव्हार-मोखाडा हे आरोहनचे कार्यक्षेत्र. जव्हारला जायचं म्हणजे मनोरपुढे उजवीकडे निघणारा विक्रमगडचा रस्ता धरायचा. तिथून पुढे जव्हार. अंतर तसं फार नाहीये, पण रस्ता इतका खड्डेवाला की आपला उत्साह निम्माशिम्मा व्हावा. किंवा आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय त्याची जाणीव करून देणारा. कारण खड्ड्यांनी बसणारे धक्के सौम्य म्हणावेत असे धक्के खेड्यातील परिस्थिती पाहता बसतात.

जव्हारला आरोहनचे कार्यालय आहे तिथलं काम उरकून धारेच्या पाड्याकडे निघालो. तुम्ही जर ‘धारेचा पाडा’ असा गुगलवर शोध घेतलात तर तुम्हाला काहीही माहिती मिळणार नाही. धारेचा पाडा साखरी ग्राम पंचायतीत मोडतो. इथली वस्ती तर आदिवासींचीच आणि ती ही अगदी थोडी. कोणी तरी म्हणाले की हजारहून अधिक नाहीये. मला तर वाटलं की तेव्हढीही नसावी.

“तिची स्कूटर दिसत्ये म्हणजे रेश्मा पोचली आहे; इथेच ‘माता-बैठक’ आहे.” माधुरी म्हणाली. गाडी थांबली. समोरच एक छोटं आणि बैठं घर होतं, आत गेल्यावर ध्यानात आलं की ते एक छोटं सभागृह होतं. म्हणजे एक खोलीच. केवळ ह्याच कारणासाठी बांधलेली! साधारण १८ बाय १८ ची. आत ‘माता-बैठक’ चालली होती. रेश्मा वीस-पंचवीस आदिवासी महिलांना माहिती देत होती. काही महिला त्यांची मुले घेऊन आल्या होत्या. मी, माधुरी व डॉ. शुभा त्यांच्यात सामील झालो. माधुरी विविध प्रोजेक्टवर देखरेख करते तर डॉ शुभा म्हणजे आरोहनच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर.

मोखाड्यात १६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यु झाल्याची बातमी २००६ साली आली तेव्हा अंजली कानिटकर व डॉ हेलन जोसेफ यांनी त्वरित ‘आरोहन’ची स्थापना केली ती जव्हार मोखाड्यात आदिवासींच्या पाड्यात जाऊन त्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करायच्या उद्देशाने. (अनेक प्रश्नांचे पदर एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केवळ ‘स्वास्थ्य’ किंवा ‘आरोग्य’ अश्या एकाच प्रश्नावर काम करून भागणार नव्हते, तर सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित करावे लागणार होते, त्यामुळे कामाची दिशा नंतर बदलण्यात आली.)

“हे माता-बाल सुरक्षा कार्ड. नोंदणी झाल्यावर लगेच मिळते. ही तर गरोदरपणाची कुंडलीच आहे!” रेश्मा माता-बैठकीतल्या स्त्रियांना सांगत होती. “नोंदणीपासून डिलिवरी व लसीकरणापर्यंत सर्व माहिती त्यात असते.”

“हे तीन रंग बघा, हिरवा, पिवळा आणि लाल. काय वाटतं तुम्हाला? तुमचं बाळ ह्यापैकी कुठल्या रंगात असलं पाहिजे?”

“हिरव्या”

“फार छान. आपलं बाळ हिरव्या रंगात येण्यासाठी काय करावं लागेल?” रेश्माने रोख आता आहाराकडे वळवला. सुदृढ बालकाला आहार ‘तिरंगा’ – लाल रंगाचे टोमाटो, गाजर, पांढऱ्या रंगाचे दुध, भात, अंडी व हिरव्या भाज्या – असा तिरंगा आहार कसा द्यावा ते रेश्मा सांगू लागली. “तिरंगा आहार घ्यायला तुम्हाला लांब जायची जरूर नाही, हे सर्व घटक तुमच्या आजूबाजूला आहेतच.”

“इथे अजूनही अनेक बालकं अंडर-वेट असतात.” शुभा मला म्हणाली. “प्रश्न केवळ आहाराचाच नाही तर चुकीच्या समजुतींचा देखील आहे. आदिवासी समाजात अनेकदा गरोदर स्त्रिया पेज पिऊन राहतात. मग त्या ‘अॅनिमिक’ होतात. कसे आरोग्य राहिल त्यांचे; कशी वाढ होईल बाळाची?”

तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर टाटा सामाजिक संशोधन संस्थेतील दोघांचा एक अभ्यासपूर्ण लेख सापडेल. ‘२००५ मध्ये केवळ पालघर जिल्ह्यातच ७१८ बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे झाला. २०१६ मध्ये ६०० पेक्षा अधिक मुले दगावली.’ त्या दोघा संशोधकांनी ३७५ मुलांचा अभ्यास केला. त्यात ५९% मुलांची वाढ खुंटली असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले.

“इथे मुलींचे शिक्षण फार होत नाही. सातवीनंतर अनेकदा शिक्षण थांबतेच. मुलगी पंधरा सोळा वर्षांची झाली की तिचे लग्न होते. मग ती गरोदर राहते. हे सर्व मोठेच प्रश्न आहेत.”

“काल-परवांच पेपरात वाचलं की चौदा-पंधरा वर्षांची मुलगी आश्रम शाळेत गरोदर राहिली.”

“आश्रम-शाळेत मुले मुली एकत्र शिकतात, आणि तिथेच राहतात. तिथे मुलीने गरोदर होणे हे काही आश्चर्यकारक नाही. अनेकदा अश्या मुलींची लगेच लग्ने लावून दिली जातात. त्यांच्या समाजात तो फार मोठा विधी नसतो. मुलगी एक दिवशी मुलाच्या घरी जाते, बस्स!”

“इथे माता-बैठकीत ती मुलगी बघा. तिच्या हातात बाळ आहे. ती आई तर सोळा वर्षांची असेल-नसेल.”

“त्यांचंही कुपोषण होतं. अनेकदा अश्या मुली आपलं वय अठरा सांगतात. तरीही असं वाटतं की त्या लहान आहेत. लहान वयात माता होण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. केवळ सामाजिकच नव्हे तर शारीरिक देखील.”

रेश्मा महिलांशी त्यांच्या समस्यांबद्दल बोलू लागली. चतुराईने तिने चर्चा ग्रामसभेकडे वळवली आणि ‘महिला ग्रामसभेचे’ आयोजन करण्याचे महत्त्व पटवून दिले. पण मोठ्ठा अडसर तर महिलांनी आपल्या प्रश्नाबाबत बोलू लागण्याचा होता. रेश्मा महिलांचं मन वळविण्यात कांही प्रमाणात तरी यशस्वी ठरली, त्या बोलू लागल्या पाण्याच्या प्रश्नावर! “असे प्रश्न सोडवायलाच ग्रामसभा व पुढे ग्राम-पंचायत असते.”

महिलांनी सभेत बोलणे हा एक त्यांच्या मनातला मोठ्ठा अडसर आहे. तो पार करणे सोपे नक्कीच नाही.

आता रेश्माने चर्चेचा रोख स्थलांतराच्या समस्येकडे वळवला. आदिवासींच्या पाड्यात स्थलांतर ही एक प्रचंड मोठी समस्या आहे. केवळ शेतीवर जगता येत नाही, मग एक पीक काढले की शहराच्या दिशेने कूच!

“स्थलांतर अनेक रीतीने आयुष्य कुरतडते. कित्येक जण आपल्या वृद्ध माता-पित्यांना मागे सोडून जातात. मुलांच्या शिक्षणावर पाणी सोडावे लागते, आणि आरोग्याची आबाळ होते. संपूर्ण खेड्याच्या ‘इकोनोमी’वरच अपरिमित दुष्परिणाम होतोय.”

“आरोहनने शेतकऱ्यांना दुसरे पीक कसे घेण्यासाठी मार्ग दाखवले आहेत, मदत केली आहे. आज कित्येक शेतकरी तसे दुसरे पीक काढत आहेत.”

“काही विशिष्ट भागातील स्थलांतर पन्नास टक्के कमी करण्याचा मनसुबा आरोहनने ठेवला आहे, आणि ते देखील एक आवाक्याबाहेरचं उद्दिष्ट वाटतंय, यावरूनच कल्पना करा.”

मला आठवलं, रोटरीतर्फे आम्ही भिवंडीजवळ एक बंधारा बांधत होतो. मी बांधकाम चालू असताना तिथे गेलो तेव्हा तीन फुटाच्या काठ्या उभ्या करून कित्येक मजुरांनी संसार मांडला होता. “ते शेतीची कामं संपली की इथे कामासाठी येतात. होळीला परत आपल्या गांवी जातात,” बांधकाम कंत्राटदार मला सांगत होता. परतीच्या वाटेवर मी एका झाडाखाली स्थलांतरित कुटुंबाने थाटलेला संसार बघितला.

मी चालत्या गाडीतूनच फोटो काढला. माझ्यासारख्या शहरी वास्तव्य करणाऱ्यांना स्थलांतराचा प्रश्न किती मोठ्ठा आहे हे समजायला प्रत्यक्ष भिवंडी, मोखाडा अश्या भागात फिरायला हवे, आकडेवारी प्रश्नांची माहिती देते, पण त्याबाबत जाणीवा वाढवत नाही.

अत्यंत अस्वस्थ करणारी आणि गुंतागुंतीची परिस्थिती मी पहिली, आणि ती आपल्या समोर ठेवली आहे. कितीही काम केलं तरीही अपुरेच पडणार आहे. तरीही एकत्र येऊन ठोस पावलं उचलावीच लागतील. ते अपरिहार्यच आहे.

सरकार ही जगातली सर्वात अकार्यक्षम संस्था आहे यात वादच नाही. मग ते कोणत्याही पार्टीचे असो. अनेक कार्यक्रम पेपरवर आहेत, पण लाभार्थी त्यापासून वंचित आहेत हेच कटू सत्य आहे. आरोहनसारख्या संस्था कार्यरत आहेत हा दिलासा असला तरीही मुंबईपासून केवळ दीडशे किमीवर इतकी भयाण परिस्थिती असावी हा नेत्यांनी, व्यक्तींनी आणि समाजानेही कूपमंडूक वृत्ती ठेवल्याचा आणि आत्मकेंद्रित असल्याचा परिणाम आहे यात शंकाच नाही.

विवेक पटवर्धन

InfoBank

The Infobank will serve as an unparalleled and comprehensive information hub. From sustainable development initiatives to effective governance models, the Infobank aims to empower tribal societies with the information they need to thrive. It aspires to bridge the gap between policymakers, community leaders, and the tribal population, fostering collaboration and facilitating informed decision-making.

Introducing our AROEHAN INFOBANK.

This will close in 25 seconds