Contact Us

Bungalow No 7, Suriya Nagri Society,
House No: 933, Kankradi Road,
Dahanu Road – 401602

contact@aroehan.org

+91 25202 99245

Tag: Marathi

AROEHAN : Event

Vhay, Mee Savitribai

In honour of Savitribai Phule on her 127th death anniversary, AROEHAN organised a show of “Vhay, Mee Savitribai”, a one-act play written and directed by renowned theatre personality Sushama Deshpande. “Vhay, Mee Savitri…” presents the story of life and work of the 19th century social reformers Savitribai Phule and Jotirao Phule. Sushama Deshpande wrote this script 25 years ago. She has presented over 2500 shows as a solo-performance at several places in Maharashtra and elsewhere in India. The play is translated in 5-6 other Indian languages. Very recently its English version is also staged.

Left Side: Shubhangi Bhujbal | Right Side: Shilpa Sane


The show was organised on 10th March 2024 at Mokhada Ashram school.
The play was performed by the brilliant actresses Shilpa Sane and Shubhangi Bhujbal, who are famous popular actors on Marathi television channels. Savitribai Phule and Jotiba Phule are simultaneously played by the actors alongside other significant people in their journey of revolution. The play presents different phases of Savitribai’s life through monologues, actions, and descriptions. While the acting left the audience spellbound, the struggles of Savitri and Jotiba Phule depicted in the play left one speechless. From young Savitri enjoying her childhood to her marriage with Jotiba, the journey towards becoming the student herself and then becoming a pivotal part of women’s education, each act was gracefully carried by actors. Other people such as Sagunabai, Tatya Saheb Fatima Shaikh, Yashwantrao, Dnyanoba Sasane and many others who played a pivotal role in Savitri and Jotirao’s journey were also depicted in the play.
Jotiba Phule and Savitribai were among the first social reformers in pre-independent India who pioneered new paths and opportunities for the socially disadvantaged, including women, Dalit communities, widows and strived to abolish discrimination and unfair treatment of people based on caste and gender.
Ms. Sushma Deshpande accompanied the two young actors to Mokhada for this performance. Nandita Patkar, who performs the English version of the play was also present. After the performance, Sushama Deshpande interacted with the audience. She said that she has tried to make this play as accessible as possible to all and anyone can present this play without her prior permission as Savitribai belongs to all. She told the young girls of the Mokhada Ashram School that one 11 year old school girl from Nandurbar district presents the Pawari version. She asked the Mokhada audience to try and stage the play in the local Adivasi languages.

AROEHAN : Blog

मीटर चालू बत्ती गुल !

विज्ञान आणि तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षात अनेक प्रगती केली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या जीवनात करत आहे. विज्ञानाचा सर्वात मोठा अविष्कार म्हणजे वीज निर्मिती. माणसाने कोळशापासून पाण्यापासून, सूर्याच्या ऊर्जेपासून, वाऱ्यापासून विजेची निर्मिती करत आहे. परंतु जगातील काही भाग हा ह्या विजेचा अतिरिक्त वापर करतना दिसून येतो, तर काही लोकांनी वीज कशाला म्हणतात हे देखील पाहिले नाही. 

भारतासारख्या प्रगतीशील देशात सुद्धा उच्च वर्गीय आणि शहरी भागात राहणारा माणूस आज विजेचा अतिरक्त वापर करत आहे, परंतु भारतातील ग्रामीण भागात राहणारा व्यक्ती अजूनही विजेच्या प्रतिक्षेत आहे. काही गावात विजेच्या चोरीचे प्रकार सर्रास दिसून येतात, तर काही ठिकाणी विजेचे मीटर दिले आहेत पण जोडणी न करता बिल पाठवत आहे. अशीच एक गोष्ट आहे, चांदवड गावातील काठे पाड्याच्या मधल्या गावकऱ्यांची विजेची पंचाईत!! 

डहाणू तालुक्यातील चांदवड गावातील सुमारे ४० घरे आणि २०० लोकसंख्या असलेलं काठेपाडा. गावचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोहन संस्थेने काठेपाडा मध्ये पाडा समिती स्थापन केली. पाडा समितीने आपण प्रत्येक महिन्यात आपली गावची सभा घेऊन गावातील समस्या एकत्रित येऊन सोडवल्या पाहिजे असे सर्वांचे मत झाले. तशीच एकदा एप्रिल (२०२३) महिन्यात पाडा समितीने गावाची सभा घेतली. त्या सभेत गावातील लोकांनी आपल्या गावातील विजेच्या प्रश्न बाबत चर्चा केली. चर्चा करताना असे समजले की, तालुक्याच्या महावितरण विभागाने १२ कुटुंबांसाठी हे विजेची जोडणी होणार होती ती जोडणी होण्यापूर्वीच ह्या कुटुंबाना विजेचे बिल येत होते. ह्या बिलांची रक्कम तर त्यांच्या आवाक्याबाहेर होती. ह्या कुटुंबात जास्त विजेची उपकरणे पण नाहीये तरी त्यांना साधारण ९०० ते ३००० रुपयेपर्यंत चे बिल आकारण्यात आले.तसेच विजेचे पोल हि गावात आणून ठेवले आणि जोडणी केली नव्हती. सभेत हा मुद्दा घेण्यात आला, आणि तो सोडवण्यासाठी पाडा समिती आणि सभेत जमलेल्या लोकांनी ग्रामपंचायत ला पत्र देण्याचे ठरवले. ग्रामपंचायत मधून सांगण्यात आले की, आम्ही आमच्या पातळीवर हा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न करू. एक महिना झाल्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून सर्व पाडा समिती सदस्य यांनी जवळच्या MSEB कार्यालयात भेट देण्याचे ठरवले. जून महिन्याच्या १८ तारखेला आशागड च्या MSEB कार्यालयातून विजेचे मीटर देण्यात आले आणि आकडेवारी पहायाला सांगितले. तरीही आकडेवारीनुसार विजेचे बिल हे जास्त येत होते. म्हणून जून महिन्यात (२७ तारखेला) पुन्हा एकदा ग्रामपंचायत ला अर्ज देण्यात आला. ग्रामपंचायतने या अर्जासोबत कार्यालयीन कॅव्हरिंग लेटर जोडून महावितरण च्या आशागड, डहाणू आणि पालघर कार्यालयात पत्र पाठवले तसेच त्याची एक प्रत स्थानिक आमदार यांना पण देण्यात आली. प्रत्येक आठवड्याला पाडा समिती चे सदस्य आणि गावकरी आशागड च्या MSEB च्या कार्यालयात भेटी द्यायचे पण प्रत्येक वेळी बिल रीतसर येईल असे तिथले अधिकारी सांगत होते. 

पाऊस आणि शेतीच्या कामामुळे तिकडे थोडे दुर्लक्ष झाले, पण तरीही पाडा समितीने पाठपुरावा करणे चालूच ठेवले. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा तालुका पातळीवरील MSEBच्या कार्यालयात भेट दिली आणि तिथल्या उप कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणे झाले. बिलाच्या रकमेच्या काही प्रमाण कमी करून वीज बिल भरायाला सांगितले (उदा. एका कुटुंबाचे बिल हे २४३० इतके होते तर त्यांना १९१० रुपये इतके भरण्यास सांगितले). कुणाचीही वीज जोडणी न करता जास्त बिल आले कसे, यावर त्यांनी काही न बोलता, स्थानिक अभियंताला संपर्क करून लवकरात लवकर विजेची जोडणी करावी असे सांगितले. वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की तांत्रिक कारणांमुळे बिल जास्त येत होते, आता दुरुस्ती करून मीटर वर येणाऱ्या आकड्यानुसार वीज बिल येईल असे समजावून सांगितले. डिसेंबर महिन्यात आरोहन चे कार्यकर्ते यांनी पुन्हा एकदा काठेपाड्यात भेट दिली, आणि ज्या कुटुंबांचे बिल जास्त येत होते, त्यांचे ह्या महिन्यातील बिल तपासले असता, मीटरच्या आकड्यानुसार बिल येत आहे. तर अश्या प्रकारे, मीटर सुरु ही झाले आणि नियमित बिल हि यायला लागले.

AROEHAN : Change Makers

गावातील बदल घडविणाऱ्यांसोबत प्रशिक्षण

दिनांक २८ आणि २९ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सभागृह आवारपाडा, कोटबी( ग्राम पंचायत चरी- कोटबी) येथे ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ह्या दोन दिवसीय प्रशिक्षणात आमचा गाव – आमचा विकास ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी रिसोर्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेंटर (RSCD) येथील दत्ता गुरव यांना आमंत्रित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणातील काही सत्रे आरोहन चे कार्यकर्ते भालचंद्र साळवे आणि स्नेहा गमरे यांनी घेतले. ह्या प्रशिक्षणासाठी डहाणू आणि कासा विभागातील एकूण ७ ग्रामपंचायतीतील (रानशेत – वधना, चरी – कोटबि, रायतली- चांदवड, सारणी, मोडगाव, दाभाडी, किन्हवली) सरपंच आणि उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पेसा अध्यक्ष, ग्रामस्थ, पाडा समिती सदस्य यांचा सहभाग होता. 

दत्ता गुरव यांनी ग्राम पंचायत पातळीवरील व्यवस्था, कार्य, निधी, यंत्रणा याबाबत माहिती दिली. त्यानंतर गाव गरजांचा शोध कसा घ्यावा, गाव विकासासाठी कोणता निधी उपलब्ध होतो, ग्राम पंचायत विकास आराखडे अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी सहभागी लोकांचे गट तयार करून प्रत्येक गटाला ग्राम पंचायत विकास आराखडा, समृध्दी आराखडा, स्वच्छ्ता आराखडा तयार करायला सांगितले तसेच आपण प्रत्येक आराखड्यात कोणत्या समस्या घेतल्या आणि निधीचा वापर कसा केला याचे प्रत्येक गटाने सादरीकरण केले. आरोहन तर्फे स्वशासन या विषयवार काम करणारे कार्यकर्ते भालचंद्र साळवे आणि स्नेहा गमरे यांनी पेसा कायद्याचे महत्व, पेसा गावचा आरखडा, शाळा व्यवस्थापन समिती, गाव विकासाला उपलब्ध निधी, त्याचे स्त्रोत व त्याचा योग्य वापर यावर मार्गदर्शन केले. 

प्रशिक्षणाच्या शेवटी, सहभागी कार्यकर्त्यांनी शाळेला मिळणारा निधी, अंगणवाडी ला मिळणारा निधी, समृद्धी आरखडा याबाबतचे आपले अनुभव आणि विचार मांडले. कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन चरी – कोटबी ग्राम पंचायत च्या सरपंच वसुंधरा कलांगडा यांनी केली. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी उपस्थित असलेल्या सहभागींना ग्रामसभेचे महत्व, निधीच्या योग्य नियोजनाचे महत्व सांगितले आणि ग्राम विकास कार्यक्रमात तसेच गाव विकास आराखडे तयार करण्याच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले. 

1) निधीचे नियोजन सोप्या पद्धतीने समजले 

2) ग्राम पंचायत मधील सर्व सदस्यांचा समन्वय असणे महत्वाचे जेणेंकरून गाव विकासाची कामे व्यवस्थित पार पाडता येतील 

3) सर्वांनी ग्राम सभेला हजर असावे त्याने गावात कोणत्या गोष्टी सुरु आहेत ह्याची माहिती मिळेल, सरपंचावरील अविश्वास दुर होईल.